top of page

सागरकिनाऱ्यास ईश्वरी अस्तित्वाचा अंदाज!!





बालपणीच्या अभ्यासक्रमात भूगोल विषयाचा समावेश झाला.तेव्हापासूनच मला समुद्र किनाऱ्याचे अतीव आकर्षण आहे.त्याही आधी पावसाळ्यात दुथडी भरुन वाहणाऱ्या नदीविषयी प्रचंड प्रेम वाटायचे.

ईश्वरीय आशिर्वादाने अरबी समुद्राचा भव्य सागरी किनारा लाभलेल्या मुंबई नगरीत माझे वैवाहिक जीवन सुरु झाले. वर्षानुवर्षे या सागरकिनाऱ्यास भेट देऊनही मन भरत नाही.पुन्हा नव्याने भेटीची ओढ डोळ्यांत साठवून च परतीचा प्रवास घडतो. अथांग ,विस्तीर्ण तो जलाशय डोळ्यांत साठवून ठेवू म्हटले तरी साठत नाही.मानवी मनाचे तर हे द्योतक नाही.कितीही जिवलग व्यक्ती म्हटलं तरी तिच्या मनाचा थांगपत्ता लागता लागत नाही. समुद्राच्या पोटात जसा तप्त लाव्हा उसळत असतो त्याप्रमाणे द्वेष,मत्सर निंदा नालस्ती च्या द्वेषीविचारांचा लाव्हा मानवाच्या मनात उसळत असतो.किती भयंकर आहे हे!नुसत्या स्फोटाच्या कल्पनेने अंगावर सरसरून काटा येतो. पण तुलनेत सागराचे मात्र प्रचंड कौतुक वाटते.प्रत्यक्ष लक्ष्मीनारायणाचे हे आश्रयस्थान.नवरत्नांचे भांडार उरी बाळगून ही निरासक्त.चांगल्यावाईट अगणित घटनांचा अनंत काळाचा साक्षीदार असूनही स्थितप्रज्ञ योग्यासारखा निश्चल.जणू निसर्गाचा भक्कम आधारस्तंभ. हे ईश्वरा, मानवी मनाला सागराची अथांगता दिलीस पण कटुतेचे सावट मनावरुन झाडून सागरासारखी निश्चलतादेण्यास जणू विसरलास वाटतं. दूरवर क्षितिजापलिकडील तुझ्या ईश्वरी अस्तित्वाचा जणू अंदाज घेण्याचा हा मनाचा भावभरा प्रयत्न.

रत्नप्रभा...

 
 
 

Comments


©2020 by micup.in

bottom of page